राज्यात गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीची सत्ता आहे. नेमक्या याच काळातल्या सरकारच्या हिशेबाचा ताळेबंद कॅगने जाहीर केलाय. कॅगच्या अहवालात पानोपानी सरकारी योजना, त्यांची अमलबजावणी आणि प्रशासकीय हलगर्जीपणा यांचं वस्त्रहरण करण्यात आलंय.