माझ्या सर्व वाचकांना, ब्लॉगला फक्त भेट देऊन तो चाळणाऱ्यांना, सर्व मित्रांना, त्यांच्या परिवारांना, कुटुंबीयांना आणि सर्व परिचित तसंच अपरिचितांनाही दीपावलीच्या हार्दिक सुभेच्छा…
दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांनीच दिल्या घेतल्या पाहिजेत, फक्त अट एकच आहे, त्यातली औपचारिकता टाळूयात, जमेल तितकी आणि शक्य होईल तितकं या औपचारिकतेला फाटा देऊयात, कारण आपल्याला कुठलीही निवडणूक लढवायची नाहीय की अन्य कुठेही जाऊन नेतेगिरी करायची नाहीय.
दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या घेतल्या नसल्या तरी त्या असतातच की, मी कुणाला शुभेच्छा दिल्या नाहीत किंवा कुणाकडून स्वीकारल्या नाहीतर तर शुभेच्छा थोड्याच संपणार आहेत… शुभेच्छा विश्वाच्या अंतापर्यंत टिकतील, कारण त्याची ताकद अफाट आहे…
दिवाळी हा प्रकाशाचा, ज्योतीचा, उजेडाचा आणि तेजाचा उत्सव म्हणूनच साजरा व्हायला हवा. हीच फक्त एक माफक अपेक्षा…
शुभेच्छा तर आहेतच, लोभही वृद्धींगत व्हावा…
मेघराज पाटील
themeghraaj@gmail.com